Ad will apear here
Next
‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’
‘स्टार प्रवाह’वरील नायिकांकडून नवरात्रीच्या शुभेच्छा
नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. याच निमित्ताने ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांमधील नायिकांनी भरभरून शुभेच्छा देतानाच स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण यांविषयी रोखठोक मते मांडली आहेत.

नम्रता प्रधान‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा म्हणजेच नम्रता प्रधानने नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देत, महिलांनी स्वावलंबी होणे गरजेचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. ‘संसाराचा गाडा सांभाळताना मुलांचे संगोपन करणारी, नोकरी करून घराला आधार देणारी ‘ती’ ही कर्ती स्त्रीच असते. या कर्त्या स्त्रीचा सन्मान व्हायलाच हवा,’ असे मत नम्रताने व्यक्त केले. ‘छत्रीवाली’ मालिकेमधून मधुराच्या रूपात हीच कर्ती स्त्री साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंदही नम्रताने या निमित्ताने व्यक्त केला.
 
रेवती‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवतीने संसारासोबतच शिक्षणाचा ध्यासही घेतला आहे. लग्नानंतर संसारातच अडकून न राहता आपले छंद आपल्या आवडी-निवडी प्रत्येक स्त्रीने जपायला हव्यात, असे तिला वाटते. इच्छेपुढे आभाळही ठेंगणे असते. स्त्री शिक्षित असेल, तर संपूर्ण कुटुंबाला ती योग्य दिशा देऊ शकते. त्यामुळेच लग्नानंतरदेखील रेवती म्हणजेच ‘छोटी मालकीण’ आपले शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
 
नुपूर परुळेकर‘नकळत सारे घडले’मधील नेहा म्हणजेच नुपूर परुळेकरच्या मते परंपरेसोबतच आधुनिक विचारांची कास धरणेही महत्त्वाचे आहे. गगनभरारीचे स्वप्न पाहण्याचा आणि ते सत्यात उतरवण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. मालिकेत नेहाच्या रूपात आदर्श आई, आदर्श सून, आदर्श पत्नी ते यशस्वी डॉक्टर या भूमिकेत वावरायला मिळत असल्याचा विशेष आनंद नेहाला वाटतो.
 
अमृता पवार‘ललित २०५’मधील भैरवी म्हणजेच अमृता पवारच्या मते स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. तिच्यामध्ये अफाट शक्ती होती, आहे आणि राहणारच. त्यामुळेच कितीही दु:खाचे कसोटीचे प्रसंग आले, तरी ती त्याचा सामना खंबीरपणे करू शकते. हाच खंबीरपणा भैरवीमध्ये आहे. ‘आपल्यातील खऱ्या शक्तीचा शोध घेतला, तर कोणतीच गोष्ट अवघड नाही,’ असे अमृता पवारला वाटते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZULBT
Similar Posts
‘स्टार्स’च्या आठवणीतली दिवाळी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना शुभेच्छा देत काही खास आठवणींचे गाठोडे उघडले आहे. काहींनी बालपणीच्या दिवाळीची सांगतानाच आता तशी दिवाळी साजरी करता येत नसल्याची खंत व्यक्त केली.
अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन मुंबई : अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘सेट नव्हे, हे तर माझे दुसरे घर’ मुंबई : नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ ही मालिका सहा ऑस्टपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाली आहे. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित...
‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याचा प्रत्यय देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणे हा आनंद त्यांना सुखावणारा होता

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language